·
गावपातळीवरील नैसर्गिक
साधनसंपत्तीची माहिती अद्ययावत ठेवणे.
·
वनदिन, हवामानदिन, पर्यावरणदिन, वसुंधरा दिन
व वृक्षारोपण दिन साजरा करणे.
·
अपारंपारिक उर्जा विकास
कार्यक्रमांतर्गत सुधारीत चुली, बायोगॅस, सौर चूल, सौर
पथदिवे इ. कार्यक्रम
राबविणे.
·
वैयक्तिक शौचालये, सांडपाणी निर्मूलन
अंतर्गत गटारे, शोषखड्डा, परसबाग इत्यादी
कार्यक्रम हाती घेणे व राबविणे.
·
चराईबंदी, कुऱ्हाडबंदी कार्यक्रम
राबविण्यासाठी ग्रामसभा, मासिकसभा माध्यमातून
लोकांचा पांठिंबा मिळविणे.
·
नर्सरी, रोपवाटीका कार्यक्रम
हाती घेणे.
·
पर्यावरण विकासाच्या दृष्टिने
लोकांमध्ये जनजागृती कार्यक्रम हाती
घेणे, शाळेचा सहभाग प्रामुख्याने घेणे.
·
जवाहर ग्रामसमृध्दी योजना
व हरीयाली कार्यक्रमातून पडीक
जमीनीचा विकास, जलसंधारण, वृक्ष संवर्धन
कार्यक्रम हाती घेणे.
·
पाणलोट क्षेत्र विकास
कार्यक्रमात जनतेचा सहभाग विशेषत:
महिलांचा सहभाग घेणे.
·
फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत सामाजिक वनीकरण कार्यक्रम घेणे, उत्तम शेतकरी निवडणे
व त्यांना प्रोत्साहन देणे.
·
ग्रामपंचायतीच्या जमीनीवर
व गायरान क्षेत्रात वनीकरण करणे.
·
पर्यावरण मित्रमंडळ, शेतकरी मंडळ
स्थापन करणे.
·
शेतकरी मेळावा, कृषी व पशुपक्षी
प्रदर्शन, वृक्षदिंडी इ. कार्यक्रम हाती
घेणे.
·
वन पर्यावरण संदर्भात
असलेल्या कायद्याची माहिती जनतेला
देणे व त्याच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेणे.
· महिला मंडळे, स्वसंहाय्यता बचत
गटाच्या महिलांचा सहभाग घेणे, महिलांना
भाजीपाला निर्मिमी, परसबाग, इंधनबचत याबाबत
प्रशिक्षण घेणे.
·
खाजगी क्षारयुक्त व पडीक
जमिनीच्या विकासासाठी प्रयत्न करणे.
· शेतकऱ्यांना (सुधारित बियाणे, कीड
व्यवस्थापन पध्दती, सेंद्रिय खताचा
वापर, गांडूळ खत प्रसार) व नवीन
तंत्रज्ञानाची माहिती देणे,
·
प्लॅस्टिकच्या न वापराबाबत, प्लॅस्टिक कॅरीबॅग बंदी
बाबत प्रयत्न करणे.
·
पर्यावरण संरक्षणासाठी विविध
प्रकल्प, कार्यक्रमासाठी ग्रामनिधीतून तरतूद
करणे.
· प्रौढ नागरिकांना उघडयावर
शौचास बसविणेस ग्रामसभांद्वारे बंदी
घालणे, यासाठी वैयक्तिक व सार्वजनिक
शौचालय बांधकामास प्रोत्साहन देणे.
·
आकाशवाणी, दूरदर्शन, पोस्टर्स इ. प्रभावी
प्रसिध्दी माध्यमांद्वारे प्रसिध्दी
व प्रचार करणे.
·
पाणी वापर व नियोजनाबाबत
गावपातळीवर जनजागृती करणे.
·
शिवकालीन पाणी साठवण
योजनेअंतर्गत पावसाचे पाणी संकलित
करुन पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत
बळकट करणे.
·
फलोत्पादन कार्यक्रमासाठी जनजागृती
करुन शेतकऱ्यांना फळबाग
लागवडीसाठी प्रवृत्त करणे.
·
नैसर्गिक साधन संपत्तीवर
आधारीत महिलांसाठी स्वयं-रोजगार निर्माण
करुन शाश्वत ग्रामविकास साधण्यासाठी
तातडीच्या उपाय योजना करणे.
·
विविध जैवीक संसाधन
विकास करणे.
·
गावपातळीवरील नैसर्गिक
साधन संपत्ती जतन करणे.
· शासकिय वन विभाग, सामाजिक
वनीकरण, मृदसंधारण विभाग, महाराष्ट्र जल प्राधिकरण, पाणी
पुरवठा व स्वच्छता विभाग, ग्राम
विकास विभाग, स्वसहाय्यता बचत
गट यांना सहकार्य करावे.
· आपल्या गावास गावातील
नैसर्गिक साधन संपत्ती, गावाचा शाश्वत
विकास, पर्यावरणीयदृष्टया स्वच्छ गाव, याबाबत अभिमान
असावा.
ही माहिती संवाद व क्षमता
विकास कक्ष, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन आणि परिवेश: पर्यावरण
व विकास केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथील अनुक्रमे डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, भाप्रसे
व डॉ. भारत भुषण, प्राध्यापक, पर्यावरण नियोजन या दोघांतर्फे समन्वयीत
कार्यक्रमाच्या संयुक्त प्रयत्नातून ग्रामस्तरावरील पर्यावरण नियोजन व शाश्वत
विकासासाठी तयार केलेल्या पंचायत पंचांग - ग्रामपंचायतींसाठी मासिक मार्गदर्शिका
या पुस्तिकेतून घेतली आहे.